Dakhani Swarajya

संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034

Dakhani Swarajya
ताज्या बातम्या पुस्तक परीक्षण लेख

आपल्या देशाप्रती कर्तव्याची जाणीव व्हावी म्हणून २६ जानेवारी या दिवशी राष्ट्रीय उत्सव म्हणून सर्व भारतीयांनी सहभागी व्हावे - किशोर चौहान

ताज्या बातम्या
Dakhani Swarajya 28 January 2025 08:52 AM

आपल्या देशाप्रती कर्तव्याची जाणीव व्हावी म्हणून २६ जानेवारी या दिवशी राष्ट्रीय उत्सव म्हणून सर्व भारतीयांनी सहभागी व्हावे - किशोर चौहान


दखनी स्वराज्य, पैठण – 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या संविधांनामुळे आपणाला हक्क व स्वातंत्र्य मिळाले परंतु या मधील काळात आपण आपले देशाप्रती कर्तव्य विसरलो. सर्व भारतीयांना आपल्या कर्तव्यांची जाणीव व्हावी म्हणून २६ जानेवारी हा दिवस एक राष्ट्रीय उत्सव म्हणून साजरा होणे गरजेचे आहे. या दिवशी सर्व भारतीयांनी सहभाग घेतल्यास भारतामध्ये एक नवचैतन्य निर्माण होईल. आपण सर्व भारतीय, सर्व जाती समान आहेत व सर्व जाती महान आहेत, असे प्रतिपादन शालिवाहन पतसंस्थेचे चेअरमन किशोर चौहान यांनी केले. 
पैठण येथील शालिवाहन पतसंस्थेच्या मुख्य कार्यालय येथे प्रजासत्ताक दिन निमित्त चेअरमन किशोर चौहान यांचे हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला. या प्रसंगी बोलतांना किशोर चौहान यांनी, १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले पण १९४७ ते १९५० या काळात आपणास स्वतःचे संविधान नव्हते. या काळात स्वातंत्र्य मिळूनही भारतामध्ये ब्रिटीशांचे कायदे कानून लागू होते. ड्राफ्टींग कमिटीची अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारताचे संविधान तयार करण्यासाठी २ वर्ष, ११ महीने व १८ दिवस लागले. या कामी त्यांना संविधान समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद व त्यांचे सहकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. २६ नोव्हेंबर १९४९ या दिवशी आपले संविधान पुर्णपणे तयार झाले पण २६ जानेवारी १९५० रोजी आपण संविधान स्वीकारले आणि आपणास खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य व हक्क मिळाले. 
या प्रसंगी शालिवाहन चे उपाध्यक्ष डॉ. जयंत जोशी, मानद सचिव प्रकाश कसलीवाल, संचालक दीपक आहुजा, दीपक लखमले, गणेश लोहिया, डॉ. पंडित किल्लारीकर, बाबासाहेब राऊत, सुनील शेळके, तज्ञ संचालक ॲड.राजेंद्र गोर्डे, सौ. सुमनताई मस्के, मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मण गायके, मुख्य अधिकारी शिवाजी घोडसे, कर्ज विभाग प्रमुख रामदास संदलसे आदि उपस्थित होते. या वेळी आस्वाद विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर कार्यक्रम सादर केले. संस्थेचे जनसंपर्क अधिकारी नरेश सिकची यांनी देशभक्तीपर गीत सादर केले. 
या वेळी माजी नगराध्यक्ष सोमनाथ परदेशी, संतकुमार धवण, महेश रोहेरा, अरुण बल्लाळ, पोलिस कॉंस्टेबल कल्याण ढाकणे, पवन लोहिया, योगेश लोहिया, बलराम लोळगे, एकनाथ खंडागळे, शेषराव नलभे, अमित दाभाडे, डॉ. शोभा पारिख, रावसाहेब जाधव, संदीप कुरेवार, डिके महाराज, संतोष गोबरे, वसंत गोरे, विजय सुते, लक्ष्मण लाड, दामोधर गरड, दीपक लिखिते, सूरज लोहिया, अशोक कुंढारे,  प्रवीण घुगे, एकनाथ पटेल, आस्वाद शाळेच्या मुख्याध्यापिका अनीता खरात व सर्व शिक्षक वृंद आदींसह मोठ्या संख्येने संस्थेचे सभासद व ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचलन देवीदास पूर्णपात्रे यांनी केले तर शालिवाहन पतसंस्थेचे सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.