संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
‘आऊसाहेब सेवा प्रतिष्ठान’ आणि ‘बुलंद छावा’ या दोन संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ५ लाख रुपयांच्या अपघाती विमा संरक्षणाची योजना मोफत राबवण्यात आली. या योजनेचा लाभ २८२ नागरिकांनी घेऊन आपल्या व आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी एक मजबूत पाऊल उचलले.
ही विमा योजना १४ मे २०२५ रोजी पार पडली. कोणत्याही जाती, धर्म, भेद न करता योजना पूर्णतः मोफत ठेवण्यात आली होती.
कार्यक्रमस्थळी नागरिकांनी स्वतःहून येऊन विमा अर्ज भरले. यामध्ये अपघाती विमा ही केवळ आकड्यांची गोष्ट नसून, ही एक सामाजिक सुरक्षिततेची आणि जबाबदारीची भावना असल्याचे दिव्या पाटील यांनी सांगितले.
या उपक्रमामागे बुलंद छावा परिषदेचे संस्थापक अध्यक्ष श्री. सुरेश वाकडे यांचे मार्गदर्शन व ‘आऊसाहेब सेवा प्रतिष्ठान’च्या संस्थापक अध्यक्ष डॉ. दिव्या पाटील यांची सामाजिक जाणिवेतून प्रेरित झालेली दूरदृष्टी होती. या दोघांच्या नेतृत्वात आणि दोन्ही संस्थांच्या समन्वयातून हा उपक्रम अत्यंत यशस्वीपणे पार पडला.
कार्यक्रमात विशेष उपस्थिती म्हणून अनेक मान्यवरांनी हजेरी लावली. या सर्वश्री
खासदार डॉ. कल्याणरावजी काळे, खासदार संदिपानजी भुमरे,मंत्री अतुलजी सावे,
आमदार संजनाताई जाधव,
आमदार संजयजी केनेकर,
माजी खासदार चंद्रकांतजी खैरे, आमदार प्रदीपजी जैस्वाल, राष्ट्रवादी काँग्रेसचे
जिल्हा प्रमुख कैलासरावजी पाटील, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष उपमहापौर राजेंद्र जंजाळ, पृथ्वीराज पवार, संदीप भाऊ बोरसे, प्रभाकर मते, सतीशजी मेटे, संजय तायडे पाटील, शिल्पा वाडकर, मनिषा भन्साळी, सतीश वेताळ, नितीन देशमुख, रवींद्र नीळ, रेखा वाटोळे, तनश्री गायकवाड, सुकन्या भोसले, छाया खाजेकर, रोहिणी खैरे, भरती राजपूत, शिंपी समिती अध्यक्ष बाबासाहेब साबळे, रामेश्वर राजगुरे, विश्वास मुरकुटे, योगेश औताडे, शिवाजी पळसकर इत्यादी उपस्थित होते.