संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
बालानगर (ता. पैठण) येथील गट
नं. २२५ च्या बाजूने जाणारा वहिवाटीचा रस्ता उच्च न्यायालय खंडपीठाच्या आदेशानंतर अखेर मोकळा करण्यात आला.
सुभेदार दुलेरखान पठाण व सायराबी पठाण यांनी २०१४ मध्ये दगड, गोटे टाकून हा रस्ता बंद केला होता. शेषराव श्यामराव गोर्डे, नेहरू गोर्डे, प्रवीण गोर्डे यांनी तहसीलदारांकडे दाद मागून रस्ता मोकळा करण्याची मागणी केली होती. तहसीलदारांचा निकाल गोर्डे यांच्या बाजूने लागला. या निर्णयाविरोधात पठाण यांनी अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांकडे अपिल केले होते. तेथेही
गोर्डे यांच्या बाजूने निकाल लागला. या निर्णयाविरोधात पठाण यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठात आव्हान दिले होते.
खंडपीठाने ११ फेब्रुवारीरोजी गोर्डे यांच्या बाजूने निकाल दिला. त्यानंतर मंडळ अधिकारी शुभांगी शिंदे, तलाठी भोसले यांच्या उपस्थितीत रस्ता मोकळा करण्यात आला. शिवाजी गोर्डे, लक्ष्मण गोर्डे, सचिन गोर्डे, सुभेदार पठाण, सलिम पठाण यांनी रस्ता
मोकळा करण्यास सहकार्य केले.