संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
शेवगाव जि.आहिल्यानगर येथील भारदे हायस्कूलच्या प्रांगणामध्ये एकता फाउंडेशनच्या शेवगाव शाखेचा उद्घाटन समारंभ एकताचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक अनंत कराड यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच मोठ्या थाटात संपन्न झाला. प्रमुख अतिथी म्हणून सचिव पत्रकार गोकुळ पवार, कोषाध्यक्ष शिवलिंग परळकर, फौजी कैलास खेडकर, प्रदेश प्रवक्ता मल्हारी खेडकर, प्रदेश संघटक देवीदास शिंदे, युवक आघाडीचे छगन पालवे, कवीवर्य उमेश घेवरीकर, प्राचार्य शिवदास सरोदे, हरीषशेठ भारदे, पत्रकार रामनाथ रुईकर, शेवगाव शिवारचे संपादक लक्ष्मण झिंजुर्के, शेवगाव शाखेचे तालुकाध्यक्ष प्रदीप बोडखे हे उपस्थित होते. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या वसुधा सावरकर, एकताचे प्रदेश युवक निमंत्रक इम्रान शेख, अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कोठुळे, पत्रकार बिभीषण चाटे यांच्यासह साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवर हजर होते.
यावेळी उपस्थित साहित्यप्रेमींना मार्गदर्शन करताना प्रा.उमेश घेवरीकर म्हणाले की संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम हे कवी होते. तत्कालीन परिस्थितीत संत साहित्याच्या माध्यमातून सामाजिक दांभिकतेवर त्यांनी लेखणीद्वारे प्रहार केला व भरकटलेल्या समाजाला दिशा देण्याचे काम केले. आज आभासी जीवन पद्धतीमुळे माणसाचा आत्मिक आनंद हरवून गेला आहे. शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी उदासीन अवस्थेत जीवन जगताना दिसतो. मराठी की इंग्रजी अशी त्याची गोंधळाची अवस्था तयार झाली आहे. त्यामुळे साहित्याच्या माध्यमातून वाचन संस्कृती टिकवण्याचा प्रयत्न झाला पाहिजे व एकता फाउंडेशन सारख्या संस्था पुढे आल्या तरच समाजाला योग्य दिशा मिळू शकेल. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना अनंतजी कराड यांनी अस्थिर समाजास व्यवस्थितरित्या मार्गस्थ करायचे असेल तर सर्वांनी भेदाभेद विसरून बंधुभावाने रहायला हवे आणि एकता फाउंडेशन हेच कार्य करत असून साहित्य, संस्कृती, शिक्षण, समाज व पर्यावरण क्षेत्रामध्ये गेल्या बारा वर्षांपासून एकताचे सर्व कार्यकर्ते निस्वार्थ भावनेने काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. संस्थेचे सचिव गोकुळ पवार यांनीही याप्रसंगी मनोगत व्यक्त करत संस्थेची भूमिका विशद केली.
द्वितीय सत्रात निमंत्रितांचे काव्य संमेलन ज्येष्ठ कवी प्रा.उमेश घेवरीकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. त्यात आत्माराम शेवाळे, आनंदा साळवे, रज्जाक शेख, नितीन गायके, राजेंद्र उदारे, वसंत सुरवसे, सविता ढाकणे, पुनम राऊत, जयश्री खाडे, अण्णासाहेब बोडखे, अरुण तमानके, बाबासाहेब अंधारे, अण्णासाहेब तहकीक, कु.वैदेही देवणे, निलेश मोरे, प्रदीप बोडखे, डॉ.बेनझीर शेख, निवृत्ती महाराज कानवडे, गौतम वाघमारे यांनी सहभाग घेतला. काव्य संमेलनाचे सूत्रसंचालन बाळासाहेब कोठुळे यांनी केले.
यावेळी एकताचे संस्थापक अध्यक्ष तथा म.सा.प.संभाजीनगर केंद्रीय कार्यकारिणी सदस्य, जेष्ठ साहित्यिक अनंत कराड व सचिव पत्रकार गोकुळ पवार यांनी शेवगाव तालुका शाखा कार्यकारिणीची उद्घोषणा केली. त्यामध्ये प्रदीप बोडखे (अध्यक्ष), आत्माराम शेवाळे (उपाध्यक्ष), निलेश मोरे (सचिव), उमेश घेवरीकर (सल्लागार), लक्ष्मण झिंजुर्के (मार्गदर्शक), रामनाथ रुईकर (प्रसिद्धी प्रमुख), पत्रकार बिभीषण चाटे (कोषाध्यक्ष), वसंत सुरवसे (कार्याध्यक्ष), अण्णासाहेब बोडखे (निमंत्रक), वसुधा सावरकर (महिला प्रतिनिधी), पुनम राऊत (सदस्य), सविता ढाकणे (सदस्य), जयश्री खाडे (सदस्य), विनोद ठाणगे (सदस्य), एड.प्रताप वाघुंबरे (सदस्य), संतोष मस्के (सदस्य) या कार्यकर्त्यांची नियुक्ती करून त्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.