संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
मुलींचे अल्पवयात बालविवाह केल्याने तिच्या मानसिक, शैक्षणिक व शारिरीक अशा सर्वांगिन विकासाला खिळ बसतो. अशिक्षीत तसेच गरीब कुटूंबातील मुलींचे नात्याच असणा-या मुलाशी लग्न लावण्याचे प्रमाण अधिक असते. याबाबीची गांर्भीयाने दखल घेवुन मा. डॉ. विनयकुमार राठोड, पोलीस अधीक्षक यांनी जिल्हयातील मुलींचे होणारे बालविवाहाची गोपनीय माहिती काढुन असे बालविवाह पालकांचे समुपदेशनाने रोखण्याचे निर्देश ग्रामीण भरोसा पथकाला दिलेले आहेत.
या अनुषंगाने दिनांक 30/4/25 ते दिनांक 10/5/25 या कालावधीत अक्षय तृतीयाचे उपलब्धीवर होणारे 07 बालविवाहाची माहिती ग्रामीण भरसो पथकाचे स.पो.नि. श्रीमती आरती जाधव यांना गोपनीय बातमीदार मार्फेत मिळाली होती.
मा. पोलीस अधीक्षक यांनी या विवाहातील 07 ही अल्पवयीन वधुच्या भविष्यातील भवितव्याच्या सखोल विचार करून मा. पोलीस अधीक्षक यांनी अत्यंत गोपनीय पध्दतीने या सर्व नियोजित लग्नांचा आढावा घेतला व हे सर्व विवाह वेळीच थांबविण्याचे दृष्टीने भरोसा सेल व प्रभारी पोलीस अधिकारी यांना सुचना व मार्गदर्शन करून पालकांशी समन्वय व संवाद साधुन त्यांचे समुपदेशन करण्याबाबत आदेश दिले.
यामध्ये पोलीस ठाणे 1) पाचोड अतंर्गत केकत जळगाव येथील 15 वर्षीय मुलगी 2) पोलीस ठाणे फुलंब्री अंतर्गत 1) वानेगाव येथील 16 वर्षीय मुलगी 3) पोलीस ठाणे करमाड अंतर्गत लाडसांवगी येथील 16 वर्षीय मुलगी 4) पोलीस ठाणे खुलताबाद अतंर्गत कनकशिल येथील 16 वर्षीय मुलगी तर 5) पोलीस ठाणे वडोदबाजार अंतर्गत 1) वाघलगाव 2) बोरगाव 3) वडोदबाजार असे 03 बालविवाह असे एकुण 07 बालविवाह नियोजित होते.
यावरून दामिनी पथकांचे प्रमुख सपोनि आरती जाधव व स्थानिक पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांनी अशा नमुद ठिकाणी भेट दिली तेव्हा तेथे विवाहाची तयारी होत असतांना दिसले, यावरुन त्यांनी तात्काळ मुलींच्या आई- वडिलांची भेट घेतली असता या मुलींचे कुटूंब हे शेतकरी असुन अशिक्षित असल्याचे समजले, त्यांना विश्वासात घेवुन अधिक चर्चा करता त्यांनी त्याच्या मुलींचे वय हे 18 वर्षे पुर्ण नसल्याचे मान्य केले. तसेच मुलीचे लग्न नात्यातील मुलांशी करत असल्याचे सांगितले, त्यावर दामिनी पथकांचे सपोनि आरती जाधव व चाईल्ड लाईनचे समुपदेशक नितेश धुर्वे, सचिन दौंड, यांनी बालविवाहामुळे मुलीच्या आयुष्याबाबत होणा-या दुष्परिणामा बाबत व कायदेशिर बाबींची संपुर्ण माहिती देवुन पालकांचे व नातेवाईकांचे समुपदेशन केले. यामुळे आई- वडिल यांचे मन व मत परिवर्तन होवुन त्यांनी हा विवाह न करण्याचे मान्य केले आहे. याबाबत त्यांच्याकडुन चाईल्डलाईनचे समुपदेशक यांनी बंधपत्र लिहुन घेवुन सदर मुलीला बाल कल्याण समितीच्या समक्ष हजर करण्यात येवुन त्यांचे निर्देशानुसार पुढील कारवाई करण्यात येणार आहे.
मा. पोलीस अधीक्षक यांनी अशा प्रकारे होणारे बालविवाह रोखण्यात अग्रेसर व सक्त भुमिका घेवुन कोणत्याही अल्पवयीन मुलींचे बालविवाह करणा-या पालकांचे मन व मत परिर्वतन वेळीच करून एका अल्पवयीन मुलीचे भवितव्य धोक्यात घालण्यापासुन तसेच तिच्या कौटोबिंक बाबींचा सारासार विचार करून अत्यंत सांमजस्याने व कायदेशिर बाबीची पुर्व कल्पना देवुन तिचा होणारा बालविवाह रोखण्याबाबत सर्व प्रभारी अधिकारी यांना सुचना दिलेल्या आहेत.
या प्रकरणी सुध्दा मुलीच्या आई- वडिल व ईतर नातेवाईक यांना कायदेशिर बाबींची माहिती देवुन मुलींचे अल्पवयात लग्न करणे हा कायदेशिररित्या गुन्हा असुन असा जाणीव पुर्वक बालविवाह ठरविणा-यास किंवा त्यास प्रोत्साहन तसेच सोहळा पारपाडणा-यास दोन वर्षे सक्तमजुरी व एक लक्ष रूपये दंड किंवा दोन्ही शिक्षा ही बाल विवाह प्रतिबंध अधिनियम-2006 नुसार होवु शकते.
यामुळे पालकांनी अल्पवयीन मुलींचे लवकर लग्न करण्याचा घाट न धरता तिला उच्चतम शिक्षण घेण्यास प्रवृत्त करावे. ज्यामुळे भविष्यात मुली स्वत:चे पायावर उभे राहुन तीचे स्वत:चे उज्वल भविष्य निर्माण करून समाजात तिची एक विशिष्ट ओळख निर्माण करू शकेल.
नमुद कारवाई ही मा. डॉ. विनयकुमार राठोड, पोलीस अधीक्षक, मा. अन्नपूर्णा सिंह, अपर पोलीस अधीक्षक, यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि. आरती जाधव, स.पो.नि. सुनिल इंगळे, पो.उप.नि. शेषराव चव्हाण, पो.अंमलदार कपिल बनकर, इर्शाद पठाण, मनिषा साळवी, सपना चरवंडे, भाग्यश्री चव्हाण यांनी केली आहे.