संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
पुणे-
येथील सांस्कृतिक वारसा जपणारी संस्था काव्यनंद साहित्य कला प्रतिष्ठान कोथरूड यांनी निमंत्रित कवीची काव्य मैफिल आयोजित केली होती.
काव्यमैफिल अध्यक्षस्थानी कवी राजेंद्र वाघ (कामगार भूषण महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद, कार्याध्यक्ष), लोककवी सीताराम नरके (गीतकार सिने अभिनेते राष्ट्रपती पोलीस पदक मानकरी), संजय मरळ (सुप्रसिद्ध गायक निवेदक), कवियत्री विद्या अटक, नलिनी पवार, या काव्य मैफिलीचे मुख्य आयोजक संस्थापक अध्यक्ष कवी निवेदक अभिनेते बाळकृष्ण नेहरकर (सुप्रसिद्ध खेळ पैठणीचा) हे उपस्थित होते. काव्य मैफिलीचे प्रास्ताविक गायक कवी संजय मरळ यांनी केले. ज्येष्ठ कवियत्री रागिणी जोशी, सचिन हनमघर, दत्तात्रय खंडाळे (संवेदनशील कवी), जनाबापू पुणेकर (गायक कवी अभिनेते), नलिनी पवार, आनंद गायकवाड (कवी गायक), छगन वाघचौरे कवी गायक संगीतकार) प्रेम पाऊस सखी खंत गेय कविता मृदुल आवाजात सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध करणारी काव्य मैफिलीला टाळ्याचा कडकडाट झाला
आयोजक नेहरकर म्हणाले कवितेचं गाण व्हायला हवे ऐकणारे रसिक आहेत. वाचक खूप कमी झाले आहे. आभासी दुनियात माणूस हरवत चालला आहे, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
काव्यमैफीलीचे अध्यक्ष कामगार भूषण कवी राजेंद्र वाघ म्हणाले नेहरकर की, यांनी नवीन उपक्रम राबून साहित्याचा दर्जा उंचावला आहे. कवितेच गाण म्हणजे मनामनात राहणे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कवी हा जगताचा धनी आहे असे प्रतिपादन केले. या काव्य मैफिलीचे बहारदार दमदार सूत्रसंचालन रानकवी जगदीप वनशिव यांनी शीघ्र चारोळ्या सादर करून मैफिल रंगतदार केली. आभार प्रदर्शन हे बाळ कृष्ण नेहरकर यांनी केले. ही काव्यमैफिल कृष्णा स्टुडिओ कोथरूड पुणे येथे संपन्न झाली.