Dakhani Swarajya

संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034

Dakhani Swarajya
ताज्या बातम्या पुस्तक परीक्षण लेख

परीक्षा म्हणजे अंतिम लक्ष नाही - डॉ. शिल्पा केंद्रे

ताज्या बातम्या
Dakhani Swarajya 28 January 2025 07:24 AM

परीक्षा म्हणजे अंतिम लक्ष नाही -  डॉ. शिल्पा केंद्रे      



दै. दखनी स्वराज्य /माऊली दोबोले 



जालना : परीक्षेला जाता जाता या  कार्यक्रमात डॉ.शिल्पा केंद्रे यांनी परीक्षा ही केवळ एक जीवनातला टप्पा असून अंतिम लक्ष नाही अशा अनेक परीक्षा ला सामोरे आयुष्यामध्ये जावे लागते त्यासाठी निर्भीडपणे आपण उभे राहिले पाहिजे या कार्यक्रमाचे आयोजन सावित्री फुले महिला एकात्म समाज मंडळ जालना यांच्या वतीने छत्रपती शिवाजी विद्यालय रेवगाव येथे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी करण्यात आले होते.  या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या डॉ. शिल्पा केंद्रे यांनी परीक्षेचा कोणताही मनामध्ये तणाव न घेता केवळ अभ्यास करत राहणे जसे श्रीकृष्ण म्हणतात कर्मण्येवाधिकारस्तेमा फलेषु कदाचन कर्म करत जा आणि यश नक्की मिळेल याच पद्धतीने आपण अभ्यास करताना वेगवेगळ्या क्षेत्रातील यशस्वी व्यक्तीचे जीवन आपल्या डोळ्यासमोर ठेवले तर आपले ध्येय गाठता येईल कोणतेही संकट आले तरी जीवनात थांबले नाही पाहिजे कारण थांबणारा माणूस कधीच जिंकत नसतो त्यामुळे आपले ध्येय जिंकण्याचे आहे त्यामुळे आपले लक्ष आपण सतत डोळ्यासमोर ठेवून अभ्यास केला पाहिजे आपला नित्य नियमित अभ्यास व योग्य पद्धतीने प्राणायाम योगा याचा सराव व योग्य संतुलित आहार आपण परीक्षेच्या कालखंडात ठेवला पाहिजे त्यामुळे परीक्षा हे अंतिम लक्ष नाही तर आपल यश हे अंतिम लक्ष आहे आणि त्यामुळे आपल्या ध्येया पासून अजिबात विचलित होऊ नये असे मार्गदर्शन करण्यात आले तसेच त्यांनी शाळेतून मराठी विषयांमध्ये पहिल्या प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांला पाच हजार रुपयांचे बक्षीसही देण्याचे घोषित केले. तसेच  कार्यक्रमांमध्ये अग्र शक्ती बहु मंडळ यांच्या वतीने दहावीच्या 73 विद्यार्थ्यांना परीक्षा पॅड, पेन टोपी व पेढा भरून परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी रितू अग्रवाल श्वेता अग्रवाल शाळेचे मुख्याध्यापक कणखर सर, भानुदास दोबाले, डॉ. दिनेश जोशी अमर शिंदे, दीक्षा कोळे व सचिन कोळे उपस्थित होते.