संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
समाजातील अस्थिरता कवीला मांडता यायला पाहिजे. लोकांच्या भाषेत व्यक्त झाल्याशिवाय समाजाशी संवाद होणार नाही. लौकिक जगण्याच्या अनुभवाला छेद जाता लेखणी उचलायला हवीत. प्रतिभावान हा उत्तम कार्यकर्ता असला तरच तो स्वतःचा व्यासंग वाढवू शकतो असे प्रतिपादन सोलापूर चे प्रसिद्ध कवी नारायण सुमंत यांनी केले. एकता फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आयोजित प्रजासत्ताक दिन विशेष 35 व्या राज्यस्तरीय ऑनलाईन एकता काव्य संमेलनात ते अध्यक्षपदावरून बोलत होते. या काव्य संमेलनाचे उद्घाटन डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संभाजीनगर अभ्यास मंडळाचे सदस्य तथा जालना येथील जेष्ठ समीक्षक प्रा.डाॅ.उमेश मुंडे यांनी केले.
एकताचे संस्थापक अध्यक्ष तथा म.सा.प.संभाजीनगर केंद्रीय कार्यकारिणी सदस्य जेष्ठ साहित्यिक अनंत कराड, सचिव पत्रकार गोकुळ पवार, कोषाध्यक्ष शिवलिंग परळकर, प्रदेश संघटक देवीदास शिंदे, प्रदेश प्रवक्ता मल्हारी खेडकर, विभागीय अध्यक्ष प्रा.डाॅ.प्रकाश वाकळे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी राजेश रेवले (अंबाजोगाई), शिवाजी नामपल्ले (लातूर), शंकर राठोड (नांदेड), अशोक शर्मा (श्रीगोंदा), मनोज अग्रवाल (संभाजीनगर), सचिन चव्हाण (अहिल्यानगर), युवाकवी सिद्धेश पाटील (कोल्हापूर) या निमंत्रित मान्यवरांसह इतरही कवी कवयित्रींनी आपल्या दमदार रचना सादर करून रसिक प्रेक्षकांना तब्बल दोन तास खिळवून ठेवले. या संमेलनाचे बहारदार सूत्रसंचालन एकता फाउंडेशन शेवगाव तालुका सचिव कवी निलेश मोरे यांनी केले.
या ऑनलाईन काव्य संमेलनाच्या यशस्वीतेसाठी एकताचे उपाध्यक्ष नितीन कैतके, मिरा दगडखैर, सल्लागार एड.भाग्यश्री ढाकणे, महिला आघाडी प्रमुख रंजना फुंदे, संस्थापक सदस्य डाॅ.सचिन सानप, शिवचरित्रकार कैलास तुपे, राजेश बीडकर, व्यंगचित्रकार दिपक महाले, डाॅ.शोभा सानप, शोभा राजळे, रंजना डोळे, लता बडे, हरिप्रसाद गाडेकर, पो.काॅ.ज्ञानेश्वर पोकळे, फौजी कैलास खेडकर, महादेव राऊत, प्रा.महेश नागरे, अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष पत्रकार बाळासाहेब कोठुळे, प्रदेश युवक निमंत्रक इम्रान शेख, युवक प्रतिनिधी छगन पालवे, शिरूर तालुका विद्यार्थी आघाडी प्रमुख कार्तिक कांबळे यांनी परिश्रम घेतले.