संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
पाठबंधारे विभागाच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान
(दै.दखनी स्वराज्य, महेंद्र नरके): शेतातून गेलेल्या चारीमुळे वडवाळीच्या शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान झाले आहे. सदर शेतकऱ्याची फळबाग आणि इतर पिकाचे लाखो रुपयांचे नुकसान दरवर्षी होत आहे. वड़वाळी येथील शेतकरी भगवान विष्णू जाधव यांची गट नंबर 64 मध्ये शेती असून याच शेतातून चारी नंबर 5 गेलेली आहे. सदरील चारीमुळे पावसाचे पडलेले पाणी शेतातील पाणी व आजूबाजूचे वाहून आलेले पाणी या चारी बांधकामामुळे अडले जाते. चारी नादुरुस्त असल्याने चारीला आलेले पाणी देखील या शेतकऱ्याच्या शेतात साचून राहते. परिणामी या शेतकऱ्याला शेतामध्ये सहा सहा महिने पाण्याचे तळे साचून राहत असल्यामुळे शेतात असलेले ऊस आणि मोसंबी फळबाग नष्ट होत आहे. चारीमुळे शेतात साचलेल्या पाण्यास वाट करुन द्यावी व पिकाचे झालेले नुकसान भरपाई द्यावी यासाठी शेतकरी भगवान जाधव गेल्या चार पाच वर्षापासून जायकवाडी पाटबंधारे विभाग व तहसील कार्यालयाकडे अर्ज निवेदन देत आहेत. सध्या या शेतामध्ये कमरे इतके पाणी साचले असून शेताला तलावाचे स्वरूप आलेले आहे. शेत नुकमान भरपाईचा पंचनामा त्वरित करा व नुकसान भरपाई द्या, अशी मागणी शेतकऱ्यांने लेखी निवेदनाद्वारे केली आहे.