Dakhani Swarajya

संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034

Dakhani Swarajya
ताज्या बातम्या पुस्तक परीक्षण लेख

राज्यघटना सर्वांच्या जीवनामध्ये क्रांती घडऊन आनणारे साधन - डॉ.शिवानंद भानुसे

ताज्या बातम्या
Dakhani Swarajya 30 March 2025 08:34 PM

राज्यघटना सर्वांच्या जीवनामध्ये  क्रांती घडऊन आनणारे साधन - डॉ.शिवानंद भानुसे


दखनी स्वराज्य, छत्रपती संभाजीनगर : 

भारतीय राज्य घटना लागू होण्यापूर्वी या देशात  विषमतेवर आधारीत जी वर्ण व्यवस्था अस्थितत्वात होती ती राज्यघटनेमुळे  स्वातंत्र,  समता, बंधुता व न्यायावर आधारित  समाज व्यवस्था  स्थापित  झाली  ही  सामाजिक  क्रांतिची सुरूवात होती  या अर्थाने  भारतीय  राज्यघटना  सर्वांच्या  जीवनामध्ये  क्राती घडवून  आनणारे  साधन आहे,  असे  प्रतिपादन  प्रा. डॉ.  शिवानंद  भानुसे  यांनी केले.  झेप  आयोजित  संविधान अमृतमहोत्सवी सोहळा  रविवारी  म.सा.प.  मध्ये  डॉ.  ऋषिकेश कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली  संपन्न झाला त्यावेळी  ते  प्रमुख व्याख्याते  म्हणून  बोलत होते. सुरूवातीला  छत्रपती  शिवाजी महाराज,  महात्मा  ज्योतीराव  फूले,  राजश्री  शाहू महाराज आणि  डॉ. बाबासाहेब आंबेडकर  यांच्या  प्रतिमांचे  मान्यवराच्या हस्ते  पुजन  करण्यात  आले. यावेळी  प्रा.  डॉ.  राजेंद्र शेजूळ,  डॉ. मिलींद रणवीर, डॉ. बलराज पांडवे   यांचे  समयोचित  भाषणे  झाली. प्रा.  रविंद्र  साळवे,  प्रा.  भारत  सातपुते,  सुदेश दांडगे  यांना  मान्यवरांच्या हस्ते  मातोश्री  हरणाबाई  जाधव  वाड्मय  पुरस्कार  प्रदान  करण्यात आले,  त्यानंतर  समता सैनिक  दल  पदाधिकारी  यांचा  सन्मान करण्यात आला.  विचारपीठावर उषाताई घायतडक, श्रीमती ए. बी. साळवे, डॉ. सावली राऊत  यांची प्रमुख उपस्थिती  होती.  संविधान अमृतमहोत्सवी सोहळ्याची  भुमिका  संयोजक डी. एन. जाधव  यांनी विषद  केली. प्राचार्य  वामन  जगताप,  प्रा.  सुनिल  पोवळे, सुखदेव पल्हाळ , सुनिता गवई ,प्रा. सिध्दार्थर बनसोडे, विधीज्ञ  सर्जेराव सावळे, आशा डांगे, डॉ. हबीब भंडारे, प्रा. पंजाबराव मोरे,बाबुराव साळवे,सुनिता इंगळे,सुनील उबाळे,डॉ. वैशाली भगत, माधुरी चौधरी, प्रा. नितीन निकम,भाऊसाहेब सुरडकर,के.टी. उपदेशे, समाधान दहीवाळ,पांडू साळवे यांच्यासह साहित्यिक, विचारवंत,  कवी आणि रसिकांच्या उपस्थितीमुळे नांदापुरकर सभागृह खसाखस  भरलेले होते. सोहळ्याचे सूत्रसंचालन  प्रा.  डॉ. पंडित आराक  यांनी केले तर  आभार  सुर्यकांत तेलगोटे  यांनी  मानले.