Dakhani Swarajya

संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034

Dakhani Swarajya
ताज्या बातम्या पुस्तक परीक्षण लेख

रवींद्रनाथ टागोर विद्यालयात बक्षीस वितरण समारंभ व निरोप समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न

ताज्या बातम्या
Dakhani Swarajya 18 April 2025 02:10 PM

रवींद्रनाथ टागोर विद्यालयात  बक्षीस वितरण समारंभ व निरोप समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न

दखनी स्वराज्य (कन्नड)

:  रवींद्रनाथ टागोर विद्यालय, कनकावतीनगर, कन्नड येथे ई. पहिली ते चौथी वर्गातील विविध स्पर्धामध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ व ई. चौथीतील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ नुकताच पार पडला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री. आबासाहेब चव्हाण होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्री सागर जाधव, मुख्याध्यापक रविंद्र निळ ,कर्मवीर काकासाहेब देशमुख माध्यमिक विद्यालयाचे सेवानिवृत्त पर्यवेक्षक  रावसाहेब निकम, युवा कवयित्री तथा आदर्श शिक्षिका श्रीमती शुभदा देवरे, पालक प्रतिनिधी म्हणून सौ. गिरी व सौ.मोरेयांची उपस्थिती होती.
 कार्यक्रमाच्या सुरुवातीस विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री रवींद्र निळ यांनी विद्यालयात वर्षभर चालणाऱ्या विविध उपक्रमांची व स्पर्धांची माहिती दिली  मुख्याध्यापक रविंद्र निळ सरांनी विचार व्यक्त करताना सांगितले की शाळा म्हणजे एक संस्कार पीठ असते, जिथे आपली व्यक्तिमत्त्वाची जडणघडण होते, ज्ञान, अनुशासन, आणि मूल्यांची बीजे मनात पेरली जातात. इथून बाहेर पडताना फक्त पुस्तकातील ज्ञान नव्हे, तर जीवन कसे जगायचे हे शिकून आपण निघत आहोत.
प्रिय विद्यार्थ्यांनो, तुमचं भविष्य उज्वल आहे. पुढे अनेक संधी आहेत, आणि अनेक आव्हानंही. परंतु तुमच्यात जिद्द, मेहनत, आणि आत्मविश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. "स्वप्न पहा, पण ती पूर्ण करण्यासाठी कृती करा."तसेच कशाप्रकारे या सर्व विद्यार्थ्यांचे सर्वांगिण प्रगतीसाठी प्रयत्न करत असते यावरही त्यांनी प्रकाश टाकला.
 विद्यालयाने मागील वर्षात कब बुलबुल महोत्सवात जिल्हास्तरावर विविध स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांकाची सहा बक्षिसांची लूट करून आपला ठसा उमटवीला, तसेच बाळासाहेब पवार प्रतिष्ठान आयोजित तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेमध्ये विद्यालयाने तालुक्यातून सर्वाधिक सहभागी 60 स्पर्धक स्पर्धेत उतरवुन तिथेही तीन उत्तेजनार्थ बक्षीस मिळवली, तसेच शालेय भाषण स्पर्धा व व क्रीडा स्पर्धांमधील विजेत्यांचे बक्षीस वितरण यावेळी करण्यात आले. कार्यक्रम प्रसंगी मार्गदर्शन करीत असताना पर्यवेक्षक श्री रावसाहेब निकम यांनी विद्यालयातील सर्व इयत्तांमधून प्रथम, द्वितीय व तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख बक्षिसाची घोषणा केली.त्यानंतर युवा कवयित्री त्रिमूर्ती शुभदा देवरे यांनी आपल्या बाल जीवनातील कवितेतून विद्यार्थ्यांना जीवनाच्या सुंदर क्षणांची अनुभूती दिली व विद्यालयातील प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातात किमान एक जास्तीत जास्त बक्षीस असल्याने विद्यालयाचा दर्जा विद्यालया त काम करत असणाऱ्या शिक्षक वृंदांच्या मेहनतीचे कौतुक केले, जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्री सागर जाधव यांनीही सध्याच्या परिस्थितीतही विद्यालयाच्या प्रगतीच्या आलेखावर प्रकाश टाकताना समाधान व्यक्त केले, अध्यक्षीय समारोपात श्री.आबासाहेब चव्हाण यांनी यश मिळविण्या करता आवश्यक असणाऱ्या  बाबींवर विद्यार्थ्यांना सखोल अशी मार्गदर्शन केले, गुणवंत विद्यार्थी म्हणून चि.कैवल्य गणेश मोहिते  व कु.संस्कृती बाबासाहेब पांडव या अष्टपैलू विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली, याप्रसंगी चौथीतील निरोप घेणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले व विद्यालयास आठवण स्वरूपात समई भेट म्हणून दिली, अशाप्रकारे मोठ्या आनंददायी वातावरणामध्ये  बक्षीस वितरण व निरोप समारंभ पार पडला.
 श्रीमती वैशाली घुले यांनी सूत्रसंचालन केले.तर श्री. अमेय अहिरे यांनी आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्येष्ठ शिक्षक श्री संजय पवार, श्री अमेय अहिरे, श्री सोपान गवळी, श्री कृष्णा गायके, श्रीमती वैशाली घुले, श्रीमती मोरे व नवनाथ करवंदे यांनी परिश्रम घेतले.