संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
येथे एमआयटी कॅम्पसच्या मंथन हॉलमध्ये शिक्षण विभागाच्या वतीने दुसरे शिक्षक साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.समारोप प्रसंगी शिक्षक आमदार विक्रम काळे उपस्थित होते. ते म्हणाले की, जे जे मोठे झाले ते साहित्यिक झाले. ते बहुतांश शिक्षक, प्राध्यापक होते. त्यामुळे शिक्षकांनी लिहते व्हावे, साहित्य हे माणसाची मन जोडण्याचे काम करते, साहित्य जीवनाला उभारी देण्याचं काम करते, त्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी सुद्धा साहित्य निर्मितीची मदत होत असते. त्यासाठीच साहित्य संमेलनाची गरज असून भविष्यात राज्यस्तरीय साहित्य संमेलन घेण्याचा मनोदय याठिकाणी त्यांनी व्यक्त केला. शिवाय अशा संमेलनाला अनुदान मागणी विधिमंडळामध्ये करणार असल्याचे सांगितले.
दिवसभर, ग्रंथ दिंडी, चित्र प्रदर्शन, परिसंवाद, कवी संमेलन, कथाकथन, कवी कट्टा, पुस्तकांचे प्रकाशन आदी साहित्य कार्यक्रमांचे आयोजन संपन्न झाल्यानंतर समारोप शिक्षक आमदार मा. विक्रम काळे यांचे उपस्थितीत झाला.
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मिना, शिक्षण उप संचालक प्रकाश मुकुंद, सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी एम.के. देशमुख, स्वागताध्यक्ष अश्विनी लाठकर, डॉ. सुनिता राठोड, प्राचार्य सान्वी देशमुख, शिक्षणाधिकारी (योजना) अरुणा भूमकर, संमेलनाच्या अध्यक्षा सौ.आशा खडतरे - डांगे, एमआयटी संस्थेचे प्रमुख डॉ. मुनीश शर्मा, उपशिक्षणाधिकारी श्री. रमेश ठाकूर, श्री गोविंद गोंडे पाटील, रा.शि. संघाचे जिल्हाध्यक्ष श्री. प्रदीप विखे, एम.एम खुटे, नितीन कवडे , सेवानिवृत्त मुख्याध्यापक टी.एस. कदम, मोहन सोनवणे, शिक्षक साहित्यिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
सूत्रसंचलन रमेश मुक्ता विठ्ठल ठाकूर यांनी केले. आभार दिलीप सिरसाट यांनी मानले.