Dakhani Swarajya

संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034

Dakhani Swarajya
ताज्या बातम्या पुस्तक परीक्षण लेख

विभागीय आयुक्तांनी साधला अंबाळा येथील आदिवासी बांधवांशी संवाद

ताज्या बातम्या
Dakhani Swarajya 23 March 2025 07:58 AM

विभागीय आयुक्तांनी साधला अंबाळा येथील आदिवासी बांधवांशी संवाद


दै.दखनी स्वराज्य वृत्तसेवा

कन्नड प्रतिनिधी अरुण थोरात :

छ.संभाजीनगर चे विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी दुर्गम भागातील शंभर टक्के आदिवासी असलेल्या अंबाळा ता.कन्नड गावास दि. 22 मार्च रोजी भेट देऊण दोन तास संवाद साधला.
दुर्गम अंबाळा गावात एखाद्या वरिष्ठ अधिकार्याने भेट देण्याची ही पहिलीच वेळ होती. बैठकीत आदिवासीं बांधवांनी आपल्या समस्या मांडल्या परंतू उत्तरे व उपायोजना करण्यासाठी तहसिलदार, गटविकास अधिकारी, वनपरिक्षेत्र अधिकारी, जलजिवन मिशन चे अधिकारीच उपस्थित नसल्याने आयुक्तांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. या अधिकार्यांनी कार्यालयात बसून राहणे बंद करुण गावोगावी जाऊन फिरावे, या ग्रामस्थांचे प्रश्न न सुटल्यास बिडीओ, तहसिलदार यांना नोटीस काढणार असल्याचे सांगितले, अंबाळा ग्रामस्थांनी गावाचा रस्ता, प्रलंबित वनहक्क दावे, जलजिवन मिशन पाणी पुरवठा योजना, मुलांचे शिक्षण, शाळेस संरक्षण भींत, ग्रामविकास, जन्मप्रमाणपत्र, बिबट्या कडून पाळीव जनावरांच्या शिकारी, आदीं बाबत समस्या मांडल्या, अंबाळा येथील जलजिवन मिशन योजने अंतर्गत जलवाहिनी च्या खोद कामास वन्यजीव विभाग परवानगी देत नसल्याने काम खोंळंबल्याचे चे ग्रामस्थांनी सांगीतले, त्यावर उत्तर देण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी श्री शिंदे गैरहजर असल्यामुळे आयुक्तांनी संताप व्यक्त केला. वनपाल के.एम. पठाण यांना ही याबाबत समाधानकारक उत्तर न देता आल्यामुळे आयुक्तांनी, वन विभागाचे डिएफओ श्री नाईकवाडे व पाणीपुरवठा विभागाच्या अधिकारी यांना दुरध्वनी वरुण विचारणा केली. दोघांची ही एकमेकां वरती जबाबदारी ढकला ढकली बद्दल नाराजी व्यक्त करुण आपसात संवाद साधून काम करण्याची सुचना दिली. आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी चेतना मोरे यांनी आदिवासी जल जंगल जमिनीची काळजी घेतात जंगलांशी नाते घट्ट करण्यासाठी वनहक्क कायदा असल्याचे नमूद केले, आदिवासी विकास विभागा मार्फत बिरसा मुंडा योजनेतून स्मशानभूमी, वनपट्टयातील आदिवासी शेतकऱ्यांना विहिर व इतर कामांसाठी मदत करण्यात येईल असे अश्वासन दिले. आदिवासी बांधवांनी आपल्या मुलांना चांगल्या प्रकारचे शिक्षण द्यावे, यासाठी आश्रमशाळा , वसतीगृहांत मुलांना पाठविण्याचे अवाहन केले, यावेळी नायब तहसिलदार दिलीप सोनावणे, मंडळ अधिकारी रमेश चव्हाण, विस्तार अधिकारी श्री दारकुंडे, समाज कल्याण चे श्री पिसे, श्री कायंदे, वनहक्क शाखेचे अभिजीत पानठ, ग्रामसेवक श्री शेख, सरपंच सखाराम भुतांबरे, रावजी पथवे, दिनकर दाभाडे, रतन मधे, बाळू मेंगाळ, जयराम पथवे, हरिश थोरात, अरुण थोरात, गंगाराम अगिवले, शिक्षक कल्याण पवार, ज्ञानेश्वर वाघ, बुधा गावंडे, भावराव मेंगाळ आदींसह शेकडो आदिवासी बांधव उपस्थित होते.